
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून शौर्य गाजवत भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात घुसून त्यांना चारीमुंड्या चित केले.
या क्रांतिकारक शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कोल्हापूरच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने “भारत जिंदाबाद “यात्रेचे आयोजन करण्याच्या संदर्भातील नियोजन बैठक जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह कसबा बावडा कोल्हापूर येथे घेण्यात आली. कोल्हापुरात शनिवारी 24 मे रोजी सकाळी ९.०० वाजता कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या नेतृत्वाखाली ही भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येणार आहे.ही यात्रा ऐतिहासिक बिंदू चौकातून तिरंगी झेंडे, वीर जवानांचे चित्ररथ, शिस्तबद्ध संचलन करित या सहित हजारोंच्या संख्येने निघणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त भारतीयांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, की ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ आणि अशा या. विविधतेत एकता असणाऱ्या भारतामध्ये भ्याड हल्ला करून अनेकांचे प्राण घालवण्याचे काम पाकिस्तानने केलं पण त्याला एकतावादी भारताच्या सैनिकांनी त्यांच्याच घरात घुसून त्यांना जशास तसे उत्तर दिले आणि म्हणूनच मी भारतीय असल्याचा अभिमान भारतीय सैनिकांच्या माध्यमातून बाळगून त्यांचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी ‘भारत जिंदाबाद यात्रा’ हजारोंपेक्षा अधिक कोल्हापूर भारतीयांच्या माध्यमातून ही यात्रा रिपब्लिकन पक्ष नामदार आठवले साहेबांच्या आदेशातून काढणार आहे. भारत मातेच्या जयघोशातून या यात्रेचा प्रारंभ बिंदू चौक येथे होउन ही यात्रा शिवाजी चौक- महानगरपालिका -सीपीआर चौक ते दसरा चौक अशी निघणार असून दसरा चौकामध्ये राष्ट्रगीताने या भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप केला जाणार आहे. तरी या यात्रेमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावं अस आव्हान त्यांनी केलं. या भारत जिंदाबाद यात्रेच्या संदर्भातील अनेक नवनवीन पैलू पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी मांडले. या बैठकीला राज्य सचिव मंगलराव माळगे, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर,कामगार आघाडीचे राज्य सरचिटणीस गुणवंत नागटिळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, इचलकरंजी शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदाताई भास्कर, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे ,नूतन शहर उपाध्यक्ष विकी कांबळे, तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, अविनाश आंबपकर, प्रदीप मस्के, प्रकाश कांबळे,बिलाल नदाफ, राजश्री नाईक, रेखा बिरंजे ,योगेश आजाटे, भगवान कांबळे, के. पंडित, भारत जमने, राजेंद्र ढाले, सनी समुद्रे ,अमित काळे, प्रज्योत सूर्यवंशी, वैभव प्रधान यासहित पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व आभार सरचिटणीस जयसिंग पाडळीकर यांनी केले.