
कोल्हापूर प्रतिनिधी
युवा बौद्ध धम्म परिषदेतर्फे पोहाळे लेणीवर बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ धम्म उपासिका आणि उपासक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक त्रीसरण पंचशील घेण्यात आले. युवा बौद्ध धम्म परिषदेचे राज्य सचिव सतीश भारतवासी यांनी प्रास्ताविक केले. प्रस्ताविकामध्ये युवा बौद्ध धम्म परिषदेचा आजवरचा आढावा त्यांनी सांगितला. बौद्ध पौर्णिमेचे महत्त्व तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माची शिकवण काय आहे त्याच सोबत बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावरती जाण्यासाठी आपण काय करावे हे सांगितले. बौद्ध धम्म व धम्माची शिकवण, बुद्धाने सांगितलेला शांती करुणा समता व बंधुता हा संदेश याचे पालन आपण केले पाहिजे हे नमूद केले. युवा मार्फत वेगवेगळ्या लेणी अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येते. या लेणी दौऱ्यामध्ये अभ्यासू मार्गदर्शक असतात. आजवर लेणी अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले असून त्याद्वारे ना नफा ना तोटा अशा पद्धतीने हे दौरे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत असे सतीश भारतवासी यांनी सांगितले.
यानंतर युवा बौद्ध धम्म परिषदेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राजहंस यांनी युवा बौद्ध धम्म परिषदेमार्फत घेण्यात येणारे उपक्रम याबद्दल माहिती दिली. संविधानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी युवा बौद्ध धम्म परिषद कटिबद्ध आहे. आजवर कोल्हापूर जिल्हा व परिसरात संविधानाच्या 700 प्रति वितरीत करण्यात आलेल्या आहेत. येत्या काळामध्ये जवळपास दहा हजार संविधानाच्या प्रती वितरित करण्यात येतील अशी माहिती बापूसाहेब राजहंस यांनी दिली.
लेणी अभ्यासक आयु प्रभाकर कांबळे यांनी पोहाळे लेणींची अभ्यासपूर्ण माहिती दिली. त्यासोबत रेशीम मार्ग, कोल्हापूर जिल्ह्यात असलेली लेणी व त्या लेण्यांची रचना, वैशिष्ट्ये याचे सुंदर व अभ्यासपूर्ण विवेचन केले. या कार्यक्रमामध्ये आयु. सुनिता कांबळे यांनी वामनदादा कर्डक यांची सुंदर गीत गायन केले. त्याचसोबत मेजर बाळाराम कांबळे यांनीही आपले मत व्यक्त केले. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचे त्यांनी विवेचन केले. या कार्यक्रमामध्ये आयु. बिजली कांबळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्या भारतीय नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आणि जे सैनिक शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार आयु अजित कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित कांबळे आणि त्यांची टीम यांनी भोजनदान दिले होते. ठिकाणी जे धम्मबांधव आणि उपासक आले होते . जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांनी सहभोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यसचिव सतीश भारतवासी, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राजहंस, प्रवीणकुमार पालके, अजित कांबळे, शशिकांत कांबळे, दीपक कांबळे, , मेजर बाळाराम कांबळे, लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे, आयु. स्वाती काळे मॅडम, आयु. बिजली कांबळे, सुनिता कांबळे, सुरेश कांबळे नागावकर, बी. एम. कांबळे, शक्ती कश्यप, जीवन कांबळे,गीता शशिकांत कांबळे,स्मिता शशिकांत कांबळे,तनुजा संतोष गडकर,प्रिया अजित कांबळे,सिद्धी अजित कांबळे,शोभा संतोष गडकर,अथर्व अजित कांबळे,संग्राम सर्जेराव विधाते,अरूण बळवंत सरनाईक,जयसिंग गिराप्पा कांबळे,धनाजी आनंदा कांबळे,सुशांत प्रविणकुमार पालके,धनश्री रामदास कांबळे,माधुरी भाऊसो कांबळे,संतोष महादेव गडकर,रेश्मा संदीप कांबळे,अरुणा सागर कांबळे,स्वाती सागर कांबळे,धनाजी कांबळे,रोहित शिनगारे,भिकाजी कांबळे,रेशमा कांबळे,अनिल कांबळे,उमेश कांबळे,ओंकार कांबळे,स्नेहल कांबळे,पायल कांबळे,पूजा कांबळे,आम्रपाली दीपक कांबळे,मारुती पुंडलिक कांबळे,सुरज रामा कांबळे,सुनील कांबळे,अशोक कांबळे,संतोष सुळकुडे,दीपक बनसोडे आदी उपस्थित होते.